शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

महावितरणचा अजब कारभार १०० रुपयांसाठी थेट वीजतोड , डी एस कुलकर्णींना मात्र २.५ लाखासाठी नोटीसीचा फार्स !

आपल्याकडे श्रीमंतांसाठी आणि गरिबांसाठी वेगवेगळा न्याय असल्याची अनेक उदाहरण पदोपदी आढळून येतात.सध्या महावितरणने शून्य थकबाकी या नावाने सुरू केलेल्या या मोहिमेत एखाद्याकडे शंभर रुपयांची थकबाकी असली, तरी वीजपुरवठा तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. 


अर्थातच अशी कारवाई करण्यापूर्वी आवश्यक असणारी १५ दिवसांची नोटीस कुणालाही दिली जात नाही हेही तितकेच खरे आहे. 


मात्र त्याच वेळी डी एस कुलकर्णी सारख्या मोठ्या थकबाकीदाराची २.४० ( दोन लाख चाळीस हजार रुपये )  इतकी थकबाकी असताना त्यांना नोटीस देण्याचा सोपस्कार पार पाडून पैसे भरण्यासाठी मुदत दिली जाते . 


पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील डी एस कुलकर्णींच्या बंगल्याच्या वीजवापरासाठी ही नोटीस देण्यात आली आहे . 


यावरूनच महावितरणच्या एकूण कारभाराचा अंदाज येतो.



डी एस कुलकर्णी यांच्यासारखे लोक ज्या कारणासाठी वीज वापर करतात त्याच्यात आणि महिना १०० रुपये भरू न शकणारे लोक ज्या कारणासाठी वीज वापर करतात त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे .

असे असले तरी ज्यांची थकबाकी आहे त्यांची वीज तोडली गेली पाहिजे यात कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. 

मात्र कारवाईत दुजाभाव कशासाठी? 


जो न्याय १०० रुपये थकबाकी असणा-यांना तोच न्याय डी एस कुलकर्णी सारख्या थकबाकीदारांना का नाही? 

केवळ त्यांची राजकीय पोहोच मोठी आहे म्हणून ?

पुणे विभागामध्ये मागील सुमारे वीस दिवसांमध्ये या कारवाईमुळे साठ हजारांहून अधिक थकबाकीदारांकडे अंधार झाला आहे. पुढील काळातही थकबाकीदारांची ही वीजतोड सुरूच राहणार असल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे. 

थकबाकी अधिक असलेल्या भागात पुरेशा प्रमाणात वसुली न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही ठिकाणी कारवाईही करण्यात आली. 



त्यामुळे पुणे विभागातही शंभर रुपये थकबाकीसाठीही वीजतोड करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे २४ आणि २५ फेब्रुवारीला सुटीच्या दिवशी सुरू राहणार असून वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

मात्र अशी कारवाई डी एस कुलकर्णी सारख्या दबंग थकबाकीदारांवर करण्याचे धाडस महावितरण दाखवणार का ? हा खरा प्रश्न आहे.

वीज बील वसूली बरोबरच वीज चोरीवरही कारवाई करण्याचे धाडस महावितरण का दाखवत नाही याचे कारणही समजत नाही.


ज्या मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यात थकबीकीदारांवर कारवाई सुरू आहे. त्याच भागात वीज चोरीच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. 

त्याबाबत नागरिकांनी तक्रारीही केल्या आहेत मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा