शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

आपले काम कुठे आणि कुणामुळे अडलेय याची माहिती अशी करून घ्या !

सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण आहे. परंतु आता सहा महिने थांबूनही काही होत नाही. जनतेच्या कल्याणासाठी एका पाठोपाठ एक कायदे आणले जाताहेत . परंतु त्यातून जनतेची कामे लवकर होण्याऐवजी त्याना आता अधिकाधिक उशीर केला जात आहे. आणि आपले काम नेमके कुठे आणि कुणामुळे अडले आहे हे सामान्य माणसाला समजत नाही. परंतु खाली दिलेले काही प्रश्न सार्वजनिक प्राधिकरणाला विचारल्यास त्याची माहिती मिळू शकेल.




माहिती ही शक्ती आहि आणि माहितीच्या अधिकारामुळे प्रशासनात पारदर्शकता आणण्यात तसेच प्रत्येकाचे उत्तरदायित्व निश्चित करण्यात मदत होते. त्यामुळेच माहितीच्या अधिकाराचा वापर कुणावर सूड उगवण्यासाठी , कुणाला त्रास देण्यासाठी नाही, तर प्रशासनात पारर्शकता आणण्यासाठी आणि उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी केला गेला पाहिजे. तसे झाले तर सामान्य माणसाच्या मनगटात माहिती अधिकारामुळे मोठे बळ येउन देशा पारदर्शकता येण्यात आणि अधिकारी व कर्मचार्‍यांची जबाबदारी निश्चित करण्यास मोठी मदत होउ शकते.

परंतु  ही जबाबदारी किंवा उत्तरदायित्व निश्चित करायचे कशी ? खरे तर त्यासाठी फार काही करण्याची आवश्यकता नाही .खालील काही साधे प्रश्न आणि माहिती  अधिकारात विचारल्यास आपला अर्ज किंवा माहितीशी संबधित अधिका-याची जबाबदारी निश्चित होउ शकते

१)माझा अर्ज / तक्रार किंवा नस्ती (फाईल)  आपल्या विभागाकडे पोहोचल्यानंतर त्यासंदर्भातील दैनदिन प्रगतीचा आहवाल : उदा. माझा अर्ज / तक्रार कंवा नस्ती  आपल्या विभागातील ज्या ज्या अधिकारी-यांकडे किंवा कर्मचा-याकडे पोहोचला त्यांनी त्यावर केलेल्या प्रक्रियेची माहिती.

२) आपल्या विभागाच्या नियमाप्रमाणे अशा अर्जावर / तक्रारीवर  किंवा नस्तीवर निर्णय घेण्यासाठी लागणा-या कालावधीची माहिती.

३) माझ्या अर्जावर / तक्रारीवर  किंवा नस्तीवर   निर्णय घेण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांची नावे व हुद्दयाचा तपशील.

४) माझ्या अर्जावर / तक्रारीवर किंवा नस्तीवर   निर्णय घेण्याची अंतिम जबाबदारी ज्या  अधिका-याची    होती त्याचे नाव व हुद्दा याचा तपशील.


५) माझ्या अर्जावर / तक्रारीवर किंवा नस्तीच्या आतापर्यंतच्या  प्रवासातील सर्व कागदपत्रांच्या त्यावरील फाइल नोटरीसह प्रती

६) माझ्या अर्जावर  / तक्रारीवर  किंवा नस्ती संदर्भात योग्य वेळेत निर्णय न घेतल्याबाबत आपल्या विभागाच्या नियमाप्रमाणे संबधीतांवर करण्यात आलेल्या कारवाईची तपशीलवार माहिती व संबंधित कागदपत्रांच्या प्रति मला देण्यात याव्यात.(माहाराष्ट्राच्या बाबतीत माहाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदलाचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध (सुधारण) अधिनियम, २००७ अन्वये  केलेल्या किंवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार केलेल्या कारवाईची माहितीही मागता येउ शकेल) 

७) माझा अर्ज / तक्रार किंवा नस्तीसारखी जी प्रकरणे  माझ्या प्रकरणाच्या सात दिवस (आपण कितीही दिवस लिहू शकता) आधी आणि नंतर आपल्याकडे आली त्यावर घेन्यात आलेया अंतिम निर्णयाची तपशीलवार माहिती.

ठळक केलेल्या शब्दांपैकी नको असलेले शब्द खोडावेत,ज्या अर्जाबद्दल  किंवा तक्रारीबाबत माहिती मागवयाची आहे त्याची प्रत जोडावी तसेच ज्या नस्ती (फाइल) किंवा विषयाबद्दल वरील माहिती मागावयाची आहे त्याचा स्पष्ट उल्लेख असावा.

वरील सात साधे प्रश्न आपले काम कुठे , कुणामुळे आणि किती दिवस अडकून पडले आहे याची माहिती  मिळवून देण्यास मदत करतील. परंतु हे प्रश्न विचारताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.आपल्याला नेमकी काय माहिती आणि कशासाठी मिळवायची आहे ? त्यातून काय साध्य करायचे आहे? याची निश्चित कल्पना आपल्याला असली पाहिजे.

Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis
                   
RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                  https://vijaykumbhar-hindi.blogspot.com/
                  https://vijaykumbhar.blogspot.com/
                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा