मंगळवार, २० मार्च, २०१८

अभिलेख आढळत नसल्याप्रकरणी महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियमाखाली लिपिकावर गुन्हा दाखल !

माहिती अधिकारातील अर्जावर ‘ अभिलेखाचा आढळ होत नाही‘ असे उत्तर महाराष्ट्रात नवे नाही. अगदी असर्व प्राधिकरणात सर्रास असे उत्तर दिले जाते. मात्र पाठपुरावा केल्यास अशा प्रकरणी गुन्हा दाखल केली जाउ शकतो . 


पुण्यातील शेखर लांडगे यांनी पाठपुरावा केल्याने अखेर हवेलीचे नायब तहसिलदार यांनी आपल्याच कार्यालयातील लिपिक विशाल जाधव यांच्या विरूद्ध प्रथम खबरी अहवाल दाखल केला आहे. 


महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियमाचे कलम. ८ आणि ९ तसेच महाराष्ट्र अभिलेख अधिनियम २००५ चे कलम ८ आणि ९ अन्वये सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


शेखर लांडगे चित्तरंजन वाटिकेत नियमितपणे येत असतात आणि या प्रकरणाबाबत चर्चा करत असतात . गेली सुमारे ४ वर्षे ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत.


या प्रकरणी नायब तहसीलदार सुनील शेळके यांनी पुण्यातील खडक पोलिस ठाणे येथे  खालील प्रमाणे एफआयआर नोंदवला आहे.


तहसिल कार्यालय, हवेली, पुणे यांच्याकडे .शेखर चंदकांत लांडगे रा (कासारवाडी) यांनी दिनांक २६/७/२००५ रोजी झालेल्या  अतीवृष्टीमूळे शेतीच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे मिळण्याबाबत दि. २१/०२/२०११ रोजी अर्ज केला होता. 

परंतू सदरचे पंचनामे मिळून येत नसल्यामूळे तत्कालिन निवासी नायब तहसीलदार यांनी ते पंचनामे मिळून येत नसलेबाबत त्यांना कळविले होते.

शेखर लांडगे यांना माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी अखेर राज्य माहिती आयुक्तांकडे  अपिल दाखल केले होते.  

सुनावणीच्या निकालात   राज्य माहिती आयुक्त रविंद्र जाधव यांनी   प्रथम अपिलीय  अधिकारी तथा तहिसलदार, तहिसल कार्यालय हवेली यांना १५ दिवसांच्या आत कागदपत्रांचा शोध घ्यावा व संबंधित पंचनामे  आणि जबाब  मिळून आल्यास  लांडगे यांना देण्यात  यावेत. शोध घेवूनही पंचनामे मिळून न आल्यास तसे प्रतिज्ञापत्र आयोगास सादर करण्यास सांगीतले होते.

आदेशाप्रमाणे कागदपत्रे मिळून न आल्याने तालुका कार्यकारी दंडाधिकारी हवेली यांनी सदरची कागदपत्रे प्राप्त  होत नसल्याने त्याबाबत सबंधित लिपीकांकडून नोटीसी द्वारे खुलासा मागवून त्यानुसार खुलासा प्राप्त होताच जिल्हाधिका-यांकडून  जबाबदार कर्मचा-यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल  असे प्रतिज्ञापत्र आयोगाकडे सादर केले होते .. 

प्रतिज्ञापत्राच्या  अनुषंगाने चौकशी केली असता  दि.२६/०७/२०५  रोजी अतीवृष्टीमुळे झालेल्या  शेतीतील पिकांचे व शेतीचे झालेले नुकसानीचे झालेले एकू ण ४८ नुकसानग्रस्त शेतक-यांचे पंचनामे व जबाब तहसील कार्यालयाकडे गावकामगार तलाठी भोसरी यांनी दि.०५/०९/२००५ रोजी सादर केल्याचे त्यांनी दिलेल्या दि.२१/०४/२०११ रोजीच्या अहवालात म्हटलेआहे व सदर अहवालाची पोच पाहता तत्कालिन आवकजावक संकलन लिपिकाची स्वाक्षरीसह पोहोच दिसून येते. 

त्यामुळे सदर संकलनाचे तत्कालीन लिपीक ते सध्या कार्यरत असलेल्या लिपिकापर्यत सर्वांकडून खुलासे मागवणात आले होते.तसेच सदरचे पंचनामे आपत्कालीन व्यवस्थापनीशीही संबंधित असलाने फौजदारी संकलनाकडे याविषयी तत्कालिन लिपीकापासून आजपर्यंत कार्यरत असलेल्या लिपीका पर्यंत खुलासे मागवण्यात आले होते. 

सदर लिपिकांकडून खुलासे प्राप्त झालेअसून त्यांचे अवलोकन केलेअसता सदर लिपिकांपैकी  विशाल रामचंदजाधव यांचाकडून खुलासा प्राप्त झाला नसून त्यांना तीन वेळा नोटीसा पाठवून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती पाठवली नाही. 

तसेच तत्कालीन आवकजावक लिपिक  नवनाथ श्रीरंग गावडेयांनी सादर के लेला दि.२०/०३/२०१७ रोजीच्या खुलाशात असे नमुद केलेआहे की, सन २००५ मध्ये माझ्याकडेआवकजावक संकलनाचा चार्ज असताना या कालावधीमध्ये कामगार तलाठी भोसरी यांनी दि.०५/०९/२००५ रोजी भोसरी येथील दि.२२/०७/२००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच्या  पिकाचे नुकसानी बाबत भरपाई मिळणेबाबतचे पंचनामे तहसील कार्यालय हवेलीमधे आवकजावक संकलनाकडेजमा कलेले आहेत. 

परंतू सदरचे जमा केलेले पंचनामे पुरग्रस्तांना तात्काळ मदत दयावयाची असल्याने फौजदारी संकलनाचे त्यावेळीचे कार्यरत लिपीक विशाल जाधवतांच्या कडे सदर रिपोर्टची तात्काळ आवकजावक रजिस्टरमध्ये  नोंद घेवून संबंधि त लिपीकाची दिनांकीत स्वाक्षरीसह कामगार तलाठी भोसरी यांचा नुकसान भरपाईबाबतचा अहवाल जमा करणात आला आहे.

तसेच विशाल जाधव यांच्या नंतरचे फौजदारी संकलनाचे लिपीकि विरेंद्र माने,देशमुख,डि.एम. चव्हाण, पराग चव्हाण, व रोहन देवरे यांनी सादर केलेला खुलाशामधे त्यांना त्यांचेआधीचे कार्यरत लिपीकांनी कुठलाह प्रकारचा चार्ज व पंचनामे दिलेले नाहीत असे नमुद केलेआहेत. 

परंतु राजेंद्र चिपुरे व विकास पाटील  यांनी खुलासे दिलेले नाहीत. आमच्य कार्यालयाने केलेल्या चौकशीमधे सदरचे पंचनामे हे तत्कालीन फौजदारी संकलनाचे लिपीक विशाल जाधव यांना प्राप्त झालाचे दिसुन येत असुन त्यांना  योग्य ती संधीदेवून सुद्धा अदयापपर्यंत खुलासा सादर केलेला नाही. त्यामुळेसदर पंचनाम्यांची तत्कालिनी फौजदारी संकलनाचा लिपीक विशाल जाधव याने परसर विल्हेवाट लावली असणाची शक्यता आहे.

तरी दि. २६/०७/२००५ रोजी झालेल्या अतोवृष्टीमुळे शेखर चंद्रकांत लांडगे यांच्यासह ४७ शेतक-यांचा शेतीतील पिकांचे नुकसानीचे पंचनाम्यांचा  सप्टेंबर २००५ ते फेब्रुवारी २००९ दरमान तत्कालिन फौजदारी संकलनाचा लिपीक विशाल जाधव यानेपरसर विल्हेवाट लावली असणाची शक्यता आहे. म्हणून  माझी त्यांच्या विरोधात महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनयम २००५ चे कलम ८(१),९ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर तक्रार आहे. 

महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनयम २००५ नुसार सार्वजनिक अभिलेख गहाळ किंवा नष्ट करणा-यास  ५ वर्षे कैद किंवा १० हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होउ शकतात.

Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा